आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना केली टीका.




ऑनलाईन विदर्भ टायगर न्युज. :

एका जातीचा राजकारण चालणार नाही.. 

         मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पोलीस भरती पाठोपाठ एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. मराठा संघटनांनी ही मागणी केली होती. त्यानंतर मराठा आरक्षण च्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे राज्य सभेतील खासदार कोल्हापूर छत्रपती संभाजी राजे यानी एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाचा व वेळ आल्यास तलवारी काढू. असा इशारा दिला होता. या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलताना राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली.  

         मला जे बोलायचे ते मी बोलतो., एका जातीचं राजकारण चालणार नाही  कोणत्या प्रश्नावर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपलं चरित्र बघावं आणि नंतर टीका करावी, "अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

        "मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारने विश्वास दिला नाही. महाविकास आघाडी च सरकार अतिरेक करत आहे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशाची अंमलबजावणीकरत नाही. वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्र मध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. सरकार वारकऱ्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. असं दिसत आहे. "असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. "सरकार निष्फळ ठरलं आहे. आम्ही या विरोधात आंदोलन करत आहे. शेतकरी कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्याला काहीही फायदा मिळणार नाही. "असही आदरणीय प्रकाश आंबेडकर म्हणाले... 

                                 रिपोर्ट by लोकसत्ता वृत्त        

बातम्या प्रकाशित करण्यासाठी मला या व्हाट्सअँप नंबर संपर्क करा (9561750423)       

Comments