दिवंगत व्यंकटेश आत्राम यांच्या जयंतीचे महाकाळी येथे आयोजन*


 Vidarbh tiger news,

                *दिवंगत व्यंकटेश आत्राम यांच्या जयंतीचे महाकाळी येथे आयोजन* 


महाकाळी (पोस्ट -काचनूर ता आर्वी ) येथे संशोधक व्यंकटेश आत्राम जयंतीचे आयोजन करण्यात आले होते

महाकाळी येथील आदिवासींच्या पुनर्वसनाचा लढा व्यंकटेश आत्राम यांनी मोठ्या संघर्षाने दिला आत्राम यांच्या अथक प्रयत्नांतून व परिश्रमातून आदिवासींची लोकवस्ती या ठिकाणी निर्माण झाली आहे. 

आणि म्हणूनच इथे दिवंगत व्यंकटेश आत्राम यांचे राष्ट्रीयस्तरावर स्मारक लवकर निर्माण व्हावे अशी इथल्या आदिवासी बांधवांची मागणी आहे.  

या परिसराला व्यंकटेश आत्राम नगर हे नाव त्यानी दिले आहे. 

खरंतर आदिवासी महानायक व्यंकटेश आत्राम यांचं स्मारक इतकं दुर्लक्षित राहावं याबद्दल सर्वांनी खेद व्यक्त केला. 


याप्रसंगी व्यंकटेश आत्राम बहुउद्देशीय संस्था महाकाळी द्वारा संचालित आदिवासी समाज सेवा समिति द्वारा संशोधक व्यंकटेश आत्राम यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते 

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक ग्रंथपाल सुरेश भीवगडे तर प्रमुख उपस्थिती *भीम टायगर सेनेचे विनोद पायले*

तर व्यंकटेश आत्राम बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व आदिवासी लेखिका यशोदाताई व्यंकटेश आत्राम, व कुसुमताई कुमरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला

 कु. प्रांजली व्यंकटेश आत्राम,

राहुल इरपाचे,

 करणं पेँदाम

संकेत नेहारे

वेदांत नेहारे

ओम मडावी

 गौरव घंटेवार

 रूपेश कांबळे

राहुल प्रजापती...

राहुल कंगाली, 

रवींद्र कोडापे

प्रशांत घंटेवार (सदस्य ग्रा. प)

आकाश पोयाम सुलोचना पोयाम

 सुमित पोयाम ज्ञानेश्वर मडावी

 महेश कोडापे कोडापे

श्रद्धा मसरे, वर्षा कोडापे, अंजु पेंदाम अंजना कोडापे

 वनराज वरखडे आदी उपस्थित होते याप्रसंगी व्यंकटेश आत्राम यांच्या चरित्राचे लेखक व ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी व्यंकटेश आत्राम यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की, 

 व्यंकटेश आत्राम यांचा जन्म शुक्रवार दि.१५ जानेवारी १९४३ रोजी ब्राम्हणवाडा पो. मासोद ता- आर्वी येथे झाला .त्यांच्या वडिलांचा मृत्यु व्यंकटेश आत्राम हे अवघे चार वर्षांचे असतांनाच झाला होता. त्यामुळे त्यांची आई रेशमाबाई यांनी त्यांना प्राथमिक शाळेमध्ये दाखल केले. ते अमरावती येथील जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेमध्ये एस. एस. सी पर्यंत शिकवले. त्यानंतर त्यांनी बी. ए. केले आणि ४ जुन १९६८ ला अमरावती येथील गोविंदराव उईके यांची मुलगी यशोदाताई सोबत विवाह झाला. 

       व्यंकटेश आत्राम हे असे लेखक, साहित्यकार, इतिहासकार,संशोधक होते की, त्यांनी जगाला भारताचे बहुजन मूलनिवासी आदिवासी कोण आहेत यांचा परिचय करून दिला आहे. अशा महत्वपूर्ण साहित्याची न भूतो ना भविष्यतो अशी व्यंकटेश आत्राम यांनी निमिर्ती केली. व्यंकटेश आत्राम यांची लहानपणा पासूनच चिकित्सक वृत्ती होती व त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोण हा संशोधक होता. गोंडाची उत्पत्ति, त्यांची बोली भाषा, त्यांचे सामाजिक जीवनस्तर, त्यांची संस्कृती, त्यांचा इतिहासावर ते नेहमी विचार करत होते. त्यांची तर्कशक्ती ऐवढी होती की, सगळ्या भाषेची जननी ही संस्कृत भाषा नसून ती कोयतूर लोकांची भाषा गोंडी भाषा आहे. त्यांना नेहमी वाटत होते की गोंड समाजाच्या इतिहासाची व संस्कृतीची लोकांना नेहमी स्मरण ठेऊन या बाबतची माहिती इतर समाज बांधवास व्हावी. म्हणून ते गावा गावात पैदल फिरत होते. अशा निस्वार्थी समाज सेवा करणाऱ्या सेवकाला, साहित्यकाला, संधोधकाला महाराष्ट्र शासनाने १४ ऑगस्ट १९८५ ला आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले. 

         व्यंकटेश आत्राम हे यांचे आंबेडकरी चळवळीचे पुरस्कर्ते होते. पुढे त्यांनी आदिवासींच्या जीवन संस्कृतीचा सखोल अभ्यास करून अनेक लेख प्रसिध्द केले. त्यात त्यांनी ऐतिहासिक तथ्ये हुडकून काढली. "गोंडी भाषेचे प्राचीनत्व ", " परधानांचा शिमगा - फाग","परधानांचा लग्नोत्सव "आणि "भारतीय वास्तुशिल्पे आणि गोंड संस्कृती"हे त्यांचे गाजलेले लेख. ते नागपूर विद्यापीठात सिनेट सदस्य असतांना स्नातक स्तरावर गोंडी भाषेचा स्वतंत्र पेपर असावा असा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. यावरून गोंडी संस्कृतीवर त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेम दिसून येते. परिवारीक, सामाजिक आणि राजकीय व्याप सांभाळून ते लेखन कार्य करायचे. त्यातूनच त्यांची 'दोन क्रांतिवीर 'हे ऐतिहासिक पुस्तक १८ सप्टेंबर १९६८ ला प्रसिध्द केले आणि "गोंडी संस्कृतीचे संदर्भ " हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले हे पुस्तक त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या जन्मदिनी १५ जानेवारी १९८९ ला आंबेडकरी चळवळीने प्रकाशित केले. पुन्हा ह्या पुस्तकांनी त्यांच्या कार्यात मोलाची भर पडली. याचप्रमाणे ते आंबेडकरी चळवळीत असतांना "आदिवासी व आदिवासी समाज आणि आंबेडकरी चळवळ: समज आणि गैरसमज "हे पुस्तक १९८७ मध्ये प्रकाशित केले. 

             व्यंकटेश आत्राम केवळ लिखान वाचन करून थांबले नाहीत तर त्यांनी आदिवासींना वाचनाची आवड निर्माण व्हावी या करिता वर्धा येथे"राहुड वाचनालय",१९७९ मध्ये अमरावती येथे " जनसेवा वाचनालय " स्थापन केले. त्यांनी आदिवासीमध्ये वैचारिक जागृती आणण्याकरिता १९८४ साली जंगोराईताड नावाचे पाक्षिक गोंडी साहित्य प्रकाशनार्थ सुरू केले होते अशा महान इतिहासकारांचा अल्पशा आजाराने विजया दशमी या दिवशी इर्विन हॉस्पीटल अमरावती येथे दिनांक २ ऑक्टोंबर १९८७ रोजी मध्यरात्री १.१० वाजता दु:खद निधन झाले. अशा महान 

आदिवासी क्रांतिकारकाच्या जयंती निमित्त सर्व उपस्थित आदिवासी पुरुष महीला यांनी विनम्र अभिवादन केले.







___________________||||||________₹___________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या क्रमांकावर संपर्क करा.

Comments