पाण्यात बदल कर... ! कवी अक्षय घ. भगत यांची सुप्रसिद्ध कविता.


 Vidarbh tiger news,

    पाण्यात  बदल कर... !


असंख्य निसर्गाचे नियम, त्यात मानवाच्या


नियमांचा भर.. 


भाषा बदलली, लिपी बदलली,, हिम्मत असेल तर पाण्यात बदल कर...


जात, वंश, भेदभाव यांचा वाढता प्रादुर्भाव, सरता शेवटी रे माणसा,मातीमध्येच लागते


जावं...


गर्व तुला रे कशाचा, तुझ्या बुद्धी


मागासलेपणाचा, तूझ्या क्रूर विचार सरणीने, जीव घेतला रे


लाखो जणांचा... निसर्गाचा नियम आहे, अवयव, रचना


यामुळेच फक्त प्राणी वेगळा आहे... फक्त तूझ्या स्वार्था साठी, तू दिली जाती, धर्म, वंश याची भर,


भाषा बदलली, लिपी बदलली,, हिम्मत


असेल तर पाण्यात बदल कर.... 2


भिमाचा कार्यकर्ता


अक्षय घ. भगत

_____________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.

______________________________________________

Comments